Monday 26 September 2016

तंत्रज्ञान

बदलते शैक्षणिक तंत्रज्ञान आणि शिक्षक बदलते शैक्षणिक तंत्रज्ञान आणि शिक्षक डिजिटल शाळा : आजकाल शाळांचे पारंपारिक स्वरूप बदलत आहे. पूर्वी खडू, फळा, डस्टर, शैक्षणिक तक्ते, पृथ्वीचा गोल, मातीच्या मण्यांच्या माळा, नकाशे एवढं साहित्य वर्गात असलं की शाळेचा वर्ग सुरळीत चालू राहायचा. पण आताचे शिक्षक पाढे पाठ करून घेण्यासाठी आधी ते मोबाईलवर रेकॉर्ड करतात, मग विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेतात. आता विद्यार्थ्यांना धडा शिकविणे ज्ञानरचनावादाकडून उलटा प्रवास केल्यासारखा आहे. विद्यार्थी संगणकावर स्वत:च धडा शिकतात. काही शाळांमध्ये तर विद्यार्थी स्वत:च डिजिटल धडे पीपीटी च्या साहाय्याने तयार करतात. काही शाळांमध्ये प्रोजेक्टर आहेत. काही ठिकाणी संगणक प्रयोगशाळा (computer lab) आहेत. बरेच उत्साही शिक्षक स्वत:च्या लॅपटॉपचा वापर करतात. काहीजण तर अॅण्ड्रॉईड मोबाईल वरील अॅप्स चा चातुर्याने उपयोग करतात. डिजिटल शाळा, डिजिटल शिक्षक! जिल्हा परिषदेच्या शाळाही कात टाकताहेत. काही शाळांनी अाय एस ओ मानांकनही मिळवलंय. बऱ्याच तरुण शिक्षकांनी स्वत: कष्टाने, अभ्यासपूर्वक वेबसाईटसची निर्मिती केली अाहे. हे सर्व चित्र निश्चितच् अाशादायक अाहे. कारण अाजचा शिक्षक कुठेही कमी नाही. सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून स्वत:ची व्यवसायिक पात्रता वाढवून स्पर्धेच्या जगात टिकून राहतील तेच शिक्षक भविष्य घडवतील. शिक्षकांना बदलते तंत्रज्ञान अवगत असणे गरजेचे अाहे. त्यादृष्टीने पुढील माहिती उपयोगी पडेल. १. अॅण्ड्रॉईड मोबाईलवर (google)play store हा अायकॉन असतो. त्यावर ई-मेल अाय डी सेट केला की हजारो apps चे भांडार खुले होते. क्रेडीट किंवा डेबिट कार्ड असल्यास paid apps विकत घेऊन डाऊनलोड करता येतात. बऱ्याच free apps ही अाहेत. मराठी मूळाक्षरांसाठी varnamala lite ही फ्री अॅप अाहे. Book creator हे अॅप्लिकेशन वापरून डिजिटल धडे किंवा पुस्तक तयार करता येते. सध्या बाजारात अनेक खाजगी कंपन्यांचे android tablets अॅनिमेटेड स्वरुपात अभ्यासक्रम प्री-लोड करुन देतात. पण book creator या अॅप्लिकेशनच्या साहाय्याने शिक्षक स्वत: डिजिटल धडे किंवा पुस्तक तयार करू शकतात व google play store वर फ्री डाऊनलोडसाठी ठेऊ शकतात. २. www.youtube.com ह्या वेबसाईटवर व्हिडीअोज शेअर करता व बघता येतात. M S Excel, Powerpoint, Word यावरील फाईल्स कशा तयार करायच्या त्याचे व्हिडीअोज बघता येतात. Animated videos, cartoons, rhymes, मराठी कविता, गाणी, learning English असे विद्यार्थी व शिक्षकांना उपयोगी लाखो व्हिडीअोज यावर अाहेत. ३. परदेशात अायफोन, अायपॅड व अायपॉड चा शिक्षणासाठी अनेक शाळांमधून वापर होत अाहे. मराठी मधून फारच कमी apps असल्यामुळे अापल्याकडे त्याचा वापर केला जात नाही. परंतु भविष्यात अायपॅडचा वापर वाढण्याची शक्यता अाहे. i-Mac किंवा macbook वर ibooks store हे अॅप्लिकेशन तर जबरदस्त अाहे. यावर चित्र, अावाज, टेक्स्ट, व्हिडीओ च्या साहाय्याने digital धडे किंवा पुस्तक तयार करता येते. अधिक माहितीसाठी www.apple.com/in/ला भेट द्या. ४. फेसबुक वर महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक ग्रुप्स अाहेत. त्यावर शैक्षणिक घडामोडी, प्रयोग, उपक्रमशील शाळा व शिक्षक इत्यादींची माहिती अद्ययावत स्वरुपात शिक्षकांना मिळू शकते. ५. भारतातील व परदेशातील शैक्षणिक तंत्रज्ञानासंबंधी उपयुक्त माहिती पुढील वेबसाईटवर मिळू शकते. 1) www.emergingedtech.com 2) www.edtechreview.in 3) www.khanacademy.org 4) www.thefreemath.org 5) www.teachersofindia.org 6)www.teachersastransformers.org 7) www.ciet.nic.in

Monday 20 June 2016

कपालभारती

********************************* कपालभाती प्राणायाम : शुभ प्रभाती आयाम. ------------------------------------------------------- ********************************** कपालभातीकड़े आजार घालवणारा प्राणायाम म्हणून पाहिलं जातं. कपालभाती करून जे कुबड्यांशिवाय चालू शकत नव्हते ते कुबड्यांशिवाय पळू लागले. कपाभातिमुळे साधक आत्मनिर्भर होतो. स्वयमपूर्ण होतो. कपालभातीने हार्टमधले ब्लोकेज पहिल्या दिवसापासून उघडू लागतात व् 15 दिवसात पूर्ण ओपन होतात. कोणतेही औषध न घेता. कपालभाती करणार्याची हार्टची कार्यक्षमता वाढते. हार्टची कार्यक्षमता वाढवणारे कोणतेही औषध उपलब्ध नाही. हार्ट फंशन नॉर्मल रहातं. अजुन एक सांगतो, कपालभाती करणाऱ्याचं हार्ट कधीच बन्द पडत नाही. हल्ली 70 ते 80 टक्के लोक हार्ट बन्द पडल्याने मरतात. कपालभाती केल्याने शरीरांतर्गत व् शरीरावरील कोणत्याही प्रकारची गाठ डीझोल होते. कपालभातीने शरीरात हिट जनरेट होते त्यामुळे गाठी विर्घळतात. मग ती ब्रेस्ट मधली असो अथवा चेस्ट मधली असो. ब्रेनमधला ट्यूमर असो अथवा ओव्हरी मधले सिस्ट असो अथवा यूटेरस मधले फाइब्रॉइड असो. नाव अनेक असले तरी गाठी होण्याची टेंडेंसी एकच असते. कपालभातीने वाढलेलं कोलेस्टेरोल कमी होते. मुख्यबाब ही आहे की कपालभाती करू लागल्यावर पहिल्याच दिवशीपासून कोलेस्टेरोलची गोळी बंद करायला सांगतो. कपालभातीने वाढलेलं ईएसआर, यूरिक एसिड, एसजीओ, एसजीपीटी, क्रिटेनिन, टीएसएच, हार्मोन्स, प्रोलक्टीन लेव्हल नॉर्मल होऊ लागते. कपालभाती केल्याने हीमोग्लोबिन एका महिन्यात 12% पर्यन्त पोचते. हीमोग्लोबिन वाढीच्या एलोपेथिच्या गोळ्या खाऊन कधीही कोणाचे हीमोग्लोबिन वाढलेले पाहिले नाही. एका वर्षात 16 ते 18 पर्यन्त जाते. महिलांच् हीमोग्लोबिन 16 व् पुरुषांच्ं 18 असायला हवे. हे उत्तम लक्षण मानले जाते. कपाभातिमुळे महिलांच्या पिरिएड्सच्या सर्व तक्रारी एकामहिन्यात सामान्य होतात. कपाभातिमुळे थायरॉइडचे आजार एका महिन्यात गायब होतात. याच्याही गोळ्या पहिल्या दिवसापासून बन्द करायला सांगितले जाते. हे कपालभातीमुळे होते. एवढंच नाही तर, कपालभाती करणारा 5 मिनिटात मनाच्या पलीकडे जातो. गुड़ हार्मोन्स सीक्रेट होऊ लागतात. स्ट्रेस हामोंस गायब होतात. मनाचा व् शरीराचा थकवा नाहिसा होतो. कपालभातीने जी एकाग्रता येते ती इतरत्र येत नाही. किती विशेष आहे पहा. कपाभातीने प्लेटलेट्स वाढतात. WBC. व्हाईटब्लड सेल्स, RBC. रेडब्लड सेल्स कमी किंवा जास्त झाल्या असतील तर त्या करेक्ट होतात. बैलन्स होतात. कपालभातीने सर्व बैलन्स होते. कुणी अंडरवेट रहात नाही नी कुणी ओव्हरवेट रहात नाही. दिवसाला एक एक किलो वजन कमी होते. वजन कमी किंवा वाढवण्यासाठी कपालभाती सारखा दूसरा उपाय नाही. कपालभातीने शरीर संतुलित रहते. अंडरवेट आसण जसा आजार आहे तसं ओव्हरवेट आसण ही आजारच आहे. कपालभातीने कोलायटिस, अल्सरीटिव्ह कोलायटिस, अपचन, मंदाग्नि, संग्रहणि, जीर्ण संग्रहणि, आव असे शौच लागणार आजार बरे होतात. कोंस्टीपेशन, गैसेस, एसिडिटी हेही बरे होतात. समस्त पोटाच्या तक्रारी कपालभातीने दूर होतात. कपालभातीने पांढरेडाग, सोरायसिस, एक्झिमा, लिकोडर्मा, स्कियोडर्मा असे त्वचारोग बरे होतात. स्कियोडर्मा वर जगात औषध नाही, जो कपालभातीने बरा होतो. पोट खराब असल्यानेच त्वचारोग येत असतात. जस जसे पोट ठीक होत जाते तस तसे त्वचारोगही बरे होत जातात. अर्थ्राइटिस मधला अजुन एक प्रकार र्होमिटाइड अर्थ्राइटिस म्हणजे आर ऐ फैक्टर पॉझिटिव्ह होण. अर्थात इथे हाडांमधे विकृति येते. हाडांमधे टॉक्सिसिटी वाढते. एस्ट्रो अर्थ्राइटिस म्हणजे, हाडांमधल्या कुशन्सची झिज होते, कार्टिलेज तूटतात, लिगैमेट्स झिजतात, सांधे झिजतात. एस्ट्रो अर्थ्राइटिस मधे डॉक्टर्स औषध म्हणून स्टीरॉयड देतात. मेडिक्लसायन्स सागतं, स्टिरोइड मुळे एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे हाडं कमजोर होतात, ठिसुल होतात. गम्मत बघा, एस्ट्रो अर्थरायटिसमधे स्टिरोइड दिल्याने हाडं ठिसुल होतात व् त्याच रुगलाल स्टिरोइड दिल्याने एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे एक आजार जात नाही व् दूसरा आजार निर्माण केला जातो. असं आहे मेडिकलसायंस. विद्यानाच्या नावावर अज्ञान आहे की नाही. कपालभातीने छोटी इंटेस्टाइनला संपूर्ण व्यायाम होतो. व्यायामाने अन्न पचु लागतं. अन्न पचल्याने, कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स आतड्यात शोषल जातात. कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स अव्हेलेब्ल झाल्याने , कुशन्स, लिगैमेंट्स, हाडं बनु लागतात व् 3 ते 9 महिन्यात, अर्थ्राइटिस, एस्ट्रो अर्थ्राइटिस, एस्ट्रो पोरोसिस यासारखे हाडांचे आजार कायमचे बरे होतात. लक्षात ठेवा कैल्शियम, प्रोटीन्स, हीमोग्लोबिन, व्हिटैमिन्सच्या गोळ्या न पचताच शरीर बाहेर टाकते कारण केमिकल्स द्वारे बनलेल्या गोळ्या शरीरात शोषण्याची व्यवस्था नाही. आपल्या शरीरात रोज 10% बोनमास चेंज होत असते. ही क्रिया जन्मापासून मृत्यु पर्यन्त अखण्ड चालु असते. ती काही कारणाने बंद पडली की हाडांचे आजार येतात. कपालभाती ही क्रिया बंद पडु देत नाही. त्यासाठी कपालभाती नियमित केलि पाहिजे. विचार करा प्राणायामामधली एक क्रिया किती फायदे देते. एवढे फायदे एकाच ठिकाणी दुसरीकडे कुठेही मिळत नाहीत, म्हणून प्राणायाम सर्वश्रेष्ठ आहेत. एक महत्वाची गोष्ट की आजारी, रोगी यांनी प्राणायाम योग्य, अनुभवी गुरुकडूनच शिकले पाहिजेत. अन्यथा गड़बड़ होऊ शकते. दररोज करा सूर्य नमस्कार कपालभातीयोग। होणार नाही कोणाताच रोग।।

Tuesday 19 April 2016

वेबसाईट

▼ शिक्षकासाठी काही वेब साईड शिक्षकांसाठी महत्त्वाच्या वेबसाईटस useful websites शिक्षकांसाठि महत्वाच्या वेबसाईट्स - http://www.shikshanmitra.in/ http://www.dhyasg.blogspot.in/?m=1 http://www.shikshakkatta.blogspot.in/?m=1 http://www.crcmhaswadno3.blogspot.in/ http://www.crcmardi.blogspot.com/ http://www.ramsalgude.in/?m=1 http://www.mahazpteacher.blogspot.in/?m=1 http://www.marathishala.in/ http://mahdoesecondary.com/home.aspx http://mr.vikaspedia.in/education http://www.mscepune.in/ https://www.maharashtra.gov.in/ https://www.maharashtra.gov.in/1145/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AF http://www.dtemaharashtra.gov.in/approvedinstitues/StaticPages/HomePage.aspx https://mpsp.maharashtra.gov.in/SITE/Home/Home.aspx https://mpsp.maharashtra.gov.in/SITE/Home/Home.aspx http://www.balbharati.in/ http://www.balbharati.in/books.htm http://www.indcareer.com/maharashtra/pune/balchitravani-state-institute-educational-technology http://www.baljagat.com/ http://ncert.nic.in/ http://mavipapunevibhag.blogspot.com/ http://mahresult.nic.in/ http://marathi.e-class.in/ http://www.sanganak.info/?m=0 http://balsanskar.com/marathi/lekh/cid_158.html http://www.dydepune.com/ http://lmcschools.blogspot.in/2015/02/blog-post_13.html?m=1 http://www.navneet.com/sitemap/ http://www.avakashvedh.com/ http://school.maharashtra.gov.in/Account/Login/Login.aspx http://marathivishwakosh.in/ http://www.aaplesarkar.maharashtra.gov.in/ http://www.esense.in/ http://www.ispringsolutions.com/ http://www.a4esl.org/ http://www.eslgold.com/ http://www.englishclub.com/ http://www.english-online.org.uk/ http://www.englishexercises.org/ http://impnewszpgr.hpage.com - सदर वेबसाईट्स अत्यंत महत्वाच्या असल्याने SAVE करुन ठेवा

Wednesday 13 April 2016

उपक्रम

🎄ज्ञानरचनावाद उपक्रम🎄 〰〰〰〰〰〰〰〰〰 🦁उपक्रम :-२७) 🎍भागाकार करण्यासाठी वापरावयाच्या वेगवेगळ्या ऱचनावादी पद्धती 🎍 १) व्यवहार पध्दत :- 🌰साहीत्य :- खडे ,गोट्या , मणी , बिया , चिंचोके 🌰 अगोदर विध्यार्थ्याना खडे घेण्यास सांगु . ते विध्यार्थ्यात वाटुन द्या . व त्याना प्रश्न विचारा जसे 👇🏾 उदा . १५ खडे घे . तुझ्या ३ मित्राना एकेक करुन सारखे वाट . १) कीती खडे होते ? २) प्रत्येकालाकीती खडे मिळाल ३) शिल्लक कीती राहीले ? वरीलप्रमाणे आठ दहा वेळा सराव करुन घ्यावा . २) वरील भागाकार पध्दतीचे फलक लेखन जसे 👇🏾 प्रत्येकाला ५ _____________ कीती / खडे १५ विध्यार्थ्याना३ / वाटले १५ / ___________ शिल्लक ०० मुलाकडुन वरील ॲक्टीव्हीटी करुन घ्या . मुल कृती करीत असताना आपण त्याच्या कृतीप्रमाने फलक लेखन करावे . उदा .. संजु कडे १५ खडे होते . त्याने ३ मुलाला समान वाटले तेव्हा प्रत्येकाला ५ खडे मिळाले . आपण ५० पर्यंत संख्याची वाटणी असेच करु शकतो . त्यासाठी विध्यार्थ्याजवळ ५० खड्याची एक पेटी असावी . फरशीवर विध्यार्थ्याला वरील कृती करु द्या . नंतर वहीवर प्रत्येक विध्यार्थ्याजवळ ३६ खडे द्या . पहीले त्या बियाचे २ समान गट करुन घ्या . नंतर त्याच बियाचे ३ समान गट करुन उत्तर मांडा . त्याच बियाचे ४,५,६,७,१० पर्यंत समान गट करुन येणारे उत्तर व शिल्लक कीती राहीले हे विचारा . वरील पध्दतीने ३५ या संख्येचे ३५ गटापर्यंत विध्यार्थी उत्तर काढु शकतात .. याने भरपुर सराव होईल भागाकाराचा . 🙏🏾धन्यवाद 🙏🏾 🔘 🔘 ➖➖➖➖➖➖➖➖➖

Monday 28 March 2016

वैद्यकीय बील माहिती

         वैद्यकीय बील तयार करताना खालील कागदपत्र महत्त्वाची आहेत. ते बिलासोबत सादर करणे आवश्यक  आहे.

१) आजाराबाबतचे डॉक्टरांचे इमर्जंसी सर्टीफिकेट.

२) सर्टीफिकेटमध्ये नमूद केलेला आजार हा शासन मान्य एकूण  २७ आजारांपैकी असला पाहिजे .

३) डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांच्या पावत्या  व प्रत्यक्ष  औषधे खरेदी  केलेली  बीले यावर डॉ .ची सही शिक्का मारुन त्यावर कर्मचाऱ्याची सही मागील बाजूस  असावी .

४) सन १९६८ पूर्वी  सेवेतील कर्मचारी  असेल व मुलांचा जन्म  ६८ पूर्वी  असेल तर तीन पेक्षा  अधिक मुलांची फ्यमिलीसाईज ग्राह्य धरली जाते. पण सन १९६८ नंतरची जन्म  झालेली मुले यांची  प्यमिली तीन किंवा  त्यापेक्षा  कमी असेल  त्यांनाच  वैद्यकीय  बील देय आहे.
            वैद्यकीय  बिलाबाबत सध्याच्या प्रचलित पध्दती  व शासन नियमाबाबत या लेखात  अल्पशी माहिती देण्याचा  हा एक प्रयत्न आहे .

                                      आजार 

१) हृदय विकाराचा झटका,फुप्फुसाचा झटका
२) अतिरिक्त  दाब
३) धनुर्वात
४) घटसर्प
५) अपघात
६) गर्भपात
७) तिव्र उदर वेदना, आंत्र अवरोध
८) जोरदार रक्तस्त्राव  
९) ग्यास्ट्रो
१०) विषमज्वर
११) कोमा
१२) मनोविकृतीची सुरूवात
१३) डोळ्यांतील दृष्टिपटल सरकणे
१४) स्त्री रोग शास्त्र वा प्रसुती शास्त्र  संबंधित आजार
१५) जननमूत्र आकस्मिक आजार
१६) वायूकोष
१७)कान नाक घसा यांमध्ये विजातीय पदार्थ  गेल्यामुळे  निर्माण  झालेले
      आजार
१८) तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते अशा जन्मजात असंगती
१९) ब्रेन ट्युमर
२०) भाजणे
२१) इपिलेक्सी
२२) ॲक्यूट ग्ल्यकोमा
२३) उष्माघात
२४) रक्तासंबंधित आजार 
२५) प्राणी  चावल्यामुळे होणारी विषबाधा
२६) रसायनामुळे होणारी  विषबाधा

             गंभीर आजार

१) हृदय शस्त्रक्रिया 
२) हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया
३) ॲन्डिओप्लास्टी
४) मुत्रपिंड प्रतिरोपण
५) रक्ताचा कर्करोग

                                           

स्वच्छता संदेश

                    स्वच्छतेचे संदे

* स्वच्छ ठेवाल भवन तर सफल होईल जीवन.

* प्याल शुद्ध पाणी तर होणार नाही जीवनाची हानी.

* आरोग्याचा मूलमंत्र, शोषखड्ड्याचे सोपे तंत्र .

*  परस बाग ज्याचे घरी, आरोग्य  नांदेल त्याचे घरी.

*  शौचालय बांधण्याची करा घाई,तरच पळेल रोगराई.

*  स्वच्छ घर सुंदर  परिसर , आरोग्याचे माहेरघर.

* शरीर  ठेवाल स्वच्छ  तर जिंदगी होईल मस्त .

पाणी प्याल उकळून  तर रोगराई जाईल पळून .

*  स्वच्छ  ज्यांचा  वेश सुखी त्यांचा देश.

पर्यावरण

                      पर्यावरण  घोषवाक्ये

१) रक्षावया पर्यावरण , हाती घ्या वनीकरण.

२) निसर्गाला द्या साथ, प्रदुषणावर करुया मात.

३) जर केला वनसंहार, तर सर्वत्र होईल हाहाकार.

४) कुदळ, फावडे हाती घागर, रोपे लावा या धरणीवर.

५) पाणी जिथे कोंडी, तिथे पीक खंडी खंडी.

६) वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी  होईल घरोघरी .

७) जंगलतोडीचे करता पाप, दुष्काळाचा मिळतो शाप.

Monday 21 March 2016

अनुप्रास

                       ****अनुप्रासाची गंमत****

' काकांनी काकूचे काळे केस कात्रीने कराकरा कापले.कारण काकूने काकांच्या कपाटातले कामाचे कागद कात्रीने कराकरा कापले.'

   अशीच वेगवेगळ्या अक्षरांनी सुरु होणारी वाक्ये  तुम्ही  ऐकली असतील.ठराविक अक्षर वाक्यात  पुन्हा  पुन्हा येणे म्हणजे  अनुप्रास .
          
        चला तर, तुम्हीही तयार करा अशी गमतीशीर वाक्ये .त्यासाठी  एका विशिष्ट अक्षराने सुरू  होणारी माणसांची नावे, ठिकाणांची नावे, आडनावे, वस्तू , फुल,फळ,प्राणी , पक्षी ,क्रियापदे इत्यादींच्या याद्या तयार केल्यात तर शब्दांच्या क्रमबद्ध  जुळणीतून अशी वाक्ये तयार होऊ लागतील.
  जसे ---
   -------------------------------------------------------------------------------------------
नाव-- पवन
आडनाव --- परांजपे
ठिकाण  ---- पुणे
वस्तू ------- पिशवी
क्रियापद ----- पाठवणे
 
पवन परांजपेने पुण्याला पिशवी पाठवली.

शी वाक्ये जमली तर तुम्हाला हव्या  त्या अक्षरांची बाराखडी घ्या  आणि त्या अक्षरांपासून मजेशीर अनुप्रासाची मोठमोठी वाक्ये  तयार करा.

Saturday 19 March 2016

सूर्यमाला

ओळख सूर्यमालेची सूर्य :- सूर्यमालेतील केंद्रबिंदू. ज्याच्याभोवती सूर्यमालेतील सर्व ग्रह - उपग्रह फिरतात तो सूर्य. सूर्य हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा आहे. त्याच्या नंतरचा पृथ्वीच्या जवळचा दुसरा तारा जवळपास ४ प्रकाशवर्षे अंतरावरील नरतुरंग ह्या तारकासमुहामध्ये आहे. आपल्या पृथ्वीवरील सजीवांस जीवनावश्यक ऊर्जा सूर्या पासून मिळते. सूर्यमालेतील सर्वात अत्यावश्यक घटक असलेला सूर्य सर्वच बाबतीत मोठा आहे. याचा व्यास साधारण १३, ९२, ००० हजार कि. मी. एवढा आहे. थोडक्यात पृथ्वीच्या आकाराने तो एवढा मोठा आहे की सूर्याच्या व्यासावर १०९ पृथ्वी राहू शकतात. सूर्य प्रामुख्याने हायड्रोजन व हिलीयम ह्या वायूंचा बनलेला आहे. प्रत्येक सेकंदाला हजारो टन हायड्रोजन वायू जळून त्याचे हिलीयम वायूमध्ये रुपांतर होते. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान ६००० अंश सेल्सिअस व गाभ्याचे १, ६०, ००० अंश सेल्सिअस इतके आहे. बुध :- सूर्यमालेतील बुध हा सूर्या नंतरचा पहिला ग्रह. हा आकाराने आपल्या पृथ्वीच्या चंद्रापेक्षा थोडा मोठा आहे. याचा व्यास ४, ८७८ कि. मी. आहे. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असल्यामुळे यास आंतर ग्रह देखिल म्हणतात. म्हणजेच तो सकाळी आणि संध्याकाळीच दिसतो. याचा अर्थ तो नेहमीच दिसतो असे नाही. वर्षभरात फक्त काही काळच तो दिसतो. तो देखिल सूर्यापासून दूर असताना, अन्यवेळी सूर्यप्रकाशात लुप्त झाल्यामुळे त्याचे दर्शन होत नाही. या ग्रहावर वातावरण नसल्याने उल्कावर्षावाने हा ग्रह फारच खडबडीत झालेला दिसतो. या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण कमी असल्याने यावर वातावरणाचा अभाव जाणवतो. बुध ग्रह साधारणतः ५९ दिवसामध्ये स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास त्यास ८८ दिवस लागतात. सूर्यापासून अत्यंत जवळ म्हणजे फक्त ५७, ९०९१७५ कि. मी. ( 0.38709893 A. U.) अंतरावर असल्याने या ग्रहाचे सूर्याच्या बाजूकडील असलेल्या भागाचे तापमान ४२० अंश सेल्सिअस एवढे प्रचंड असते तर याउलट सूर्याच्या त्याच्या विरुद्ध बाजूकडील तापमान अत्यंत थंड म्हणजेच -२०० अंश सेल्सिअस असते. या दोन्ही तापमानात कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही. बुधचा सूर्याभोवतीचा भ्रमणाचा मार्ग हा दीर्घ वर्तुळाकृती आहे. तसेच सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भ्रमणावर मोठा परिणाम होतो. बुधाच्या सूर्यप्रदक्षिणा भ्रमणमार्गामध्ये नेहमीच थोडा थोडा बदल होत असतो. म्हणजेच एकदा एका भ्रमणमार्गावरून फिरल्यावर बुध ग्रह त्या मार्गास सोडून दुसर्‍या मार्गावरून भ्रमण करतो. काही वेळेस बुधाचे सूर्यावरील अधिक्रमण पाहावयास मिळते. अधिक्रमण म्हणजे सूर्य-पृथ्वी यांच्यामध्ये सरळ रेषेत ज्यावेळेस बुध ग्रह येतो त्यावेळेस बुध ग्रहाचा छोटासा ठिपका सूर्य बिंबावरून पुढे सरकताना दिसतो. एका शतकामध्ये बुधाची १३ अधिक्रमणे पाहावयास मिळतात. म्हणूनच हे अधिक्रमण अतिशय दुर्मिळ समजले जाते. बुध ग्रहास एकही चंद्र नाही. याच कारण बहुदा सूर्यापासून त्याचे कमी अंतर असावे. काहीवेळेस पृथ्वीवरून बुधाच्या कलादेखील पाहावयास मिळतात. शुक्र :- सूर्यमालेतील शुक्र हा बुधग्रहानंतरचा दुसरा ग्रह. ह्याचा आकार जवळपास आपल्या पृथ्वी एवढा आहे. याचा व्यास १२, १०४ कि. मी. आहे. या ग्रहास देखिल आंतर ग्रह म्हणतात. कारण हा ग्रह देखिल सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये आहे. याच मुळे हा ग्रह देखिल आपणास फक्त सकाळी किंवा संध्याकाळी दिसतो. या ग्रहावरील वातावरण अतिशय दाट असल्याने सूर्याचा त्यावर पडलेला प्रकाश मोठ्या प्रमाणावर परावर्तित होतो. त्यामुळे शुक्र अन्य ग्रहापेक्षा फारच तेजस्वी दिसतो. शुक्राचा स्वतःभोवती फिरण्याचा काल आणि सूर्याभोवती फिरण्याचा काळ यामध्ये मोठे वैशिष्ट्य जाणवते. शुक्राला स्वतःभोवती फिरण्यास २४३ दिवस लागतात. तर सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २२५ दिवस लागतात. म्हणजेच शुक्रावरील एक दिवस हा त्याच्या वर्षापेक्षाही मोठा आहे. शुक्राचे सूर्यापासूनचे अंतर १०८, २०८, ९३० कि. मी. ( 0.72333199 A. U.) आहे. शुक्राचा स्वतःभोवती फिरण्याच्या दिशेमध्ये कमालीचे वैशिष्ट्य आहे. सूर्यमालेतील इतर सर्व ग्रह सारख्या म्हणजेच पश्चिमेपासून पूर्वेकडे फिरतात. फक्त शुक्र हा एकच ग्रह विरुद्ध म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. याचा परिणाम असा शुक्रावर सूर्य पूर्वे ऐवजी पश्चिमेकडे उगवतो आणि पूर्वेकडे मावळतो. सूर्याभोवती फिरताना त्याच्या सूर्याकडील बाजूचे तापमान सरासरी ७३० अंश असते. शुक्र ग्रहाला बुध आंतरग्रह आहे. शुक्रावरून बुध फक्त सकाळी आणि सायंकाळी दिसू शकतो. शुक्राला देखिल एकही चंद्र नाही. पृथ्वी :- सूर्य मालिकेतील तिसरा ग्रह म्हणजे आपली लाडकी पृथ्वी. या व्यतिरिक्त आणखी दुसर्‍या शब्दांमध्ये वर्णन करायचे म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये आजपर्यंत केलेल्या संशोधनानंतर हे आढळून आले आहे की या ग्रहा व्यतिरिक्त इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही. पृथ्वीची रचना, गुरुत्वाकर्षण, सूर्यापासूनचे ठराविक अंतर आणि वातावरण यामुळेच बहुदा या ग्रहावर सजीव सृष्टी निर्माण झाली असावी. पृथ्वीचा व्यास १२, ७५६ कि. मी. आहे व तिचे सूर्यापासूनचे अंतर सुमारे १४९, ५९७, ८९० कि. मी. ( 1 A. U.) आहे. स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास पृथ्वीला जवळपास २४ तास लागतात. तर सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात. यालाच आपण एक वर्ष म्हणतो. पृथ्वीचा आस तिच्या कक्षाकडे २३. ५ अंशांनी झुकलेला आहे आणि याच अवस्थेत ती स्वतःभोवती आणि सूर्या भोवती प्रदक्षिणा करते म्हणूनच पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे ऋतू क्रम सुरू असतात. सूर्या पासून निघालेला प्रकाश पृथ्वीवर पोहचण्यास साधारणतः ८ मिनिटे लागतात. ( एका सेकंदामध्ये प्रकाश जवळपास ३ लक्ष कि. मी. अंतर पार करतो. ) पृथ्वी वर्तुळाकार मार्गाने सूर्याभोवती प्रदक्षिणा करते. त्यामध्ये थोडा जरी फरक असता म्हणजे पृथ्वी सूर्याच्या थोड्याशा अंतराने जवळ अथवा दूर असती तरी जीवसृष्टी निर्माण झाली नसती. संशोधनाद्वारे आता असे आढळून आले की पृथ्वी ही स्वतःच एक चुंबक आहे व वातावरणामध्ये तिच्याभोवती एक चुंबकीय क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे सूर्यापासून येणारे हानिकारक असे जंबुकिरण ( अल्ट्रा वायोलेट ) पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करू शकत नाहीत व ते पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळले जातात. पृथ्वीला एक उपग्रह आहे ज्यास आपण चंद्र म्हणतो. चंद्र :- पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीपासून साधारण ३ लाख कि. मी. अंतरावर आहे. खरेतर चंद्राचाच अर्थ आहे उपग्रह. पृथ्वीप्रमाणे सूर्यमालेतील सुरवातीचा बुध आणि शुक्र सोडला तर इतर सर्व ग्रहांना आपापले चंद्र आहेत. इतर ग्रहांना देखिल चंद्र असल्याचे प्रथम गॅलिलिओला कळले जेव्हा त्याला त्याच्या दुर्बिणीमधून गुरुचे चार चंद्र दिसले. नंतरच्या काळामध्ये दुर्बिणीमध्ये झालेल्या अद्ययावत बदलामुळे मंगळ ग्रहापासून प्लुटो ग्रहापर्यंत सर्व ग्रहांना चंद्र असल्याचे आढळून आले. प्रत्येक उपग्रह त्याच्या मुख्य ग्रहाच्या आकाराने लहान असतो व त्याच्या भोवती फिरत असतो. यालाच त्या ग्रहाचे परिभ्रमण असे म्हणतात. परिभ्रमणाचा काळ तो उपग्रह किती अंतरावर आहे यावर अवलंबून असते. उपग्रह जेवढा दूर तेवढाच त्याला मुख्य ग्रहाभोवती लागणारा परिभ्रमणाचा काळ जास्त व उपग्रह जेवढा जवळ तेवढाच त्याचा परिभ्रमणाचा काळ देखिल कमी. प्रत्येक ग्रहाच्या चंद्राची निर्मिती निरनिराळ्या कारणांनी झालेली असू शकते. चंद्र निर्मितीच्या तीन शक्यता आतापर्यंत शोधण्यात आल्या आहेत. १) मुख्य ग्रहाच्या निर्मितीवेळेस त्यापासून उपग्रहाची निर्मिती २) लघुग्रहांच्या किंवा क्युपरबेल्टच्या पट्ट्यातून गुरुत्वाकर्षणाने एखादा मोठा खडक खेचला जाऊन उपग्रहाची निर्मिती ३) रोश मर्यादा ओलांडल्याने एखाद्या ग्रहाचे तुकडे होऊन उपग्रहाची निर्मिती. उदा. शनीचे काही चंद्र . सूर्यमालेतील फक्त मंगळ ग्रहाचेच चंद्र आकाराने अपवाद वाटतात. कारण त्यांचा आकार इतर ग्रहांच्या चंद्राप्रमाणे गोलाकार नाही. मंगळाचे दोन्ही चंद्र ( फोबॉस आणि डिमॉस ) ओबडधोबड आहेत. त्यांना कुठलाच विशिष्ट आकार नाही. तसेच त्यांचे मंगळापासूनचे अंतर देखिल नियमबद्ध नाही. यावरून असा अंदाज निघतो कि हे चंद्र सुरवातीपासून मंगळाचे उपग्रह नसून मंगळ आणि गुरू यांच्या मध्ये असलेल्या लघुग्रहांच्या पट्ट्यातून गुरुत्वाकर्षणाने खेचले गेले असावेत. नैसर्गिक आणि कृत्रिम उपग्रह - उपग्रह म्हणजे एखाद्या ग्रहाभोवती फिरणारा आकाराने छोटा ग्रह म्हणजेच त्या मुख्य ग्रहाचा चंद्र उपग्रहाचे दोन भाग पडतात नैसर्गिक आणि कृत्रिम. नैसर्गिक उपग्रह आधीपासूनच निसर्ग नियमित नियमांप्रमाणे एखाद्या ग्रहाभोवती फिरत असतात. त्यांच्या ग्रहापासूनच्या अंतरानुसार त्यांचा परिभ्रमण काळ नियमित असतो. सध्याच्या अत्याधुनिक जगामध्ये मानवाने सूर्यमालेचा अभ्यास अधिक सोयिस्कर व्हावा म्हणून अवकाशात कृत्रिम यानं पाठविली आहेत. ही कृत्रिम यानं इतर ग्रहांच्या भोवती ठराविक अंतरावरून फिरून त्या ग्रहाची सविस्तर माहिती व चित्रे पृथ्वीवर पाठवितात. यांनाच कृत्रिम उपग्रह म्हणतात. मंगळ :- सूर्यापासून चौथा ग्रह म्हणजे मंगळ. याचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या निम्म्याहून थोडा जास्त म्हणजेच ६, ७९५ कि. मी. आहे. पृथ्वीच्या मानाने हा पहिला बहीर्ग्रह असल्याने आपणास हा ग्रह संपूर्ण रात्रभर देखिल दिसतो. सूर्यापासून याचे अंतर साधारणतः २२७, ९३६, ६४० कि. मी. ( 1.52366231 A. U.) आहे. मंगळाचा देखिल आस सूर्यभ्रमण कक्षेशी २५. १९ अंशांनी कललेला असल्याने मंगळावर देखिल पृथ्वीप्रमाणे उन्हाळा व हिवाळा असे ऋतू अनुभवयास येतात. मंगळाचे सूर्यापासूनचे अंतर हे पृथ्वीच्या सूर्यापासूनच्या अंतराच्या सुमारे दीडपट आहे. या ग्रहास स्वतःभोवती फिरण्यासाठी २४ तास ३६ मिनिटे लागतात. तर सूर्याभोवती फिरण्यास ६८७ दिवस लागतात. हा ग्रह रंगाने लालसर तांबडा दिसतो. मंगळावर अनेक ठिकाणी ज्वालामुखी आढळले आहेत. ज्यामधील काही ज्वालामुखी अजूनही कार्यरत आहेत. निरीक्षणाद्वारे मंगळावर कालव्यांच्या खुणा आढळल्या आहेत. ज्यावरून असा अंदाज लावला जातो की पूर्वी या ग्रहावर पाणी वाहत असावे व या ग्रहावर देखिल पृथ्वीप्रमाणे सजीव सृष्टी असावी. मंगळावरील ध्रृवीय भागात मोठ्या प्रमाणात गोठलेल्या अवस्थेत बर्फ आढळले आहे. मंगळाच्या सूर्याच्या बाजूने असलेल्या भागाचे तापमान २० अंश तर सूर्याच्या विरुद्ध भागाचे तापमान १८० अंश असते. मंगळाला दोन चंद्र आहेत. जवळच्या चंद्राचे नाव फोबॉस व दूरच्या चंद्राचे नाव डिमॉस आहे. सूर्य मालेतील सर्व ग्रह व त्यांचे चंद्र गोलाकार आकाराचे आहेत, तर फक्त मंगळाचे चंद्र त्यांना अपवाद आहेत. दोन्ही चंद्रांना पद्धतशीर गोलाकार आकार नाही. ते वेडे वाकडे आहेत व त्याचा आकार देखिल फार लहान आहे. फोबॉस मंगळापासून साधारणतः ५, ८८० मैलावर आहे व एक दिवसात तो मंगळास प्रदक्षिणा घालतो. तर डिमॉस मंगळापासून साधारणातः १४, ६०० मैलावर आहे व मंगळाभोवती एक प्रदक्षिणा घालण्यास त्यास ३० तास ९८ मिनिटे लागतात. लघुग्रहांचा पट्टा लघुग्रह म्हणजे एक ठराविक आकार नसलेले लहान मोठे दगड गोळे जे मंगळ व गुरू या दोन ग्रहांच्यामध्ये सूर्याभोवती गोलाकार भ्रमण करतात. लाखोंच्या संख्येने सूर्याभोवती भ्रमण करणारे हे लघुग्रह सूर्यापासून साधारण २. ७ खगोलीय अंतरामध्ये भ्रमण करतात. अठराच्या शतकामध्ये जर्मन खगोलशास्त्रज्ञ जोहान बोड याने सूर्यापासून ग्रहांच्या अनुक्रमे अंतरावर एक समीकरण तयार केले, त्यालाच 'बोडचा नियम' असे म्हणतात. यामध्ये सूर्याजवळील सुरवातीचा ग्रह ( ० ) शून्य तर त्यानंतरचा ग्रह ३ व त्यानंतरची प्रत्येक संख्या आधीच्या संख्येच्या दुपटीने ७६८ पर्यंत वाढवत न्यायची, मग त्या संख्येमध्ये ४ ही संख्या मिळवायची व येणार्‍या संख्येला १० ने भाग द्यायचा व शेवटी जे उत्तर येईल ती संख्या त्या ग्रहाचे खगोलीय एककामध्ये सूर्यापासूनचे अंतर असेल. खालील समीकरणावरून 'बोडचा नियम' आपणास कळेल ग्रह बोडचे समीकरण बोडचे उत्तर (खगोलीय एकक) ग्रहांचे सूर्यापासून प्रत्यक्ष अंतर बुध ( ०+४ ) ÷ १० .४ .३८७ शुक्र ( ३+४ ) ÷ १० .७ .७२३ पृथ्वी ( ६+४ ) ÷ १० १.० १.०० मंगळ ( १२+४ ) ÷ १० १.६ १.५२ ? ( २४+४ ) ÷ १० २.८ १.४६ - ५.७१ गुरू ( ४८+४ ) ÷ १० ५.२ ५.२० शनी ( ९६+४ ) ÷ १० १०.० ९.५४ युरेनस ( १९२+४ ) ÷ १० १९.६ १९.१८ बोडचा नियम जेव्हा प्रसिद्ध झाला तेव्हा खगोलशास्त्रज्ञांना असे वाटले की नक्कीच या नियमानुसार मंगळ व गुरू यांच्यामध्ये एखादा ग्रह असावा. १ जानेवारी १८०१ मध्ये ग्युसेप्पी पियाझ्झी ( Giuseppe Piazzi) या इटालियन खगोलशास्त्रज्ञाने सर्वप्रथम लघुग्रहाच्या पट्ट्यातील सर्वात मोठा 'सेरेस' ( Ceres) नावाचा लघुग्रह शोधला. या लघुग्रहाचा व्यास साधारण १००३ कि. मी. एवढा आहे. 'सेरेस' हाच मंगळ व गुरू या दोन ग्रहांमधील ग्रह आहे. असे त्यावेळेस समजण्यात आले, पण लगेचच पुढील वर्षी १८०२ मध्ये ६०८ कि. मी. व्यासाचा अजून एक लघुग्रह सापडला. त्याला 'पलास' ( Pallas) हे नाव देण्यात आले. त्यानंतर १८०७ मध्ये ५३८ कि. मी. व्यासाचा 'वेस्टा' ( Vesta) हा लघुग्रह शोधला गेला. त्यानंतर १८४५ पर्यंत अजून आणखी ५ लघुग्रह शोधण्यात आले. दरवर्षी जवळपास ५ या प्रमाणे १९१० पर्यंत लघुग्रहांची संख्या २५ वर गेली. नंतर हा शोधक्रम वाढत जाऊन आजपर्यंत आपण हजारो लघुग्रह शोधले आहेत. लघुग्रहाचे महत्त्वाचे तीन भाग पडतात. १ ) C-Carbonaceous २ ) S-Silicate ३ ) M-Type १ ) C-Carbonaceous :- हे लघुग्रह गडद काळ्या रंगाचे असून त्यावर पडलेली सूर्यकिरणे फार थोड्या प्रमाणात परावर्तित करतात. या लघुग्रहांना सूर्यमालेतील सर्वात वृद्ध लघुग्रह म्हटले जातात. २ ) S-Silicate :- ह्या प्रकारातील लघुग्रह पहिल्या प्रकाराएवढे गडद नसतात. याचा रंग थोडासा लालसर असून त्यावर पडलेल्या सूर्यकिरणांपैकी १/५ ( एक पंचमांश ) किरणे परावर्तित करतात. सिलिकेट प्रकाराच्या खडकाने बनलेल्या लघुग्रहांमध्ये लोह आणि दगडांचे प्रमाण जास्त आढळते. ३ ) M-Type :- वरील दोन्ही प्रकारच्या मानाने ह्या प्रकारातील लघुग्रह प्रकाशकिरणे जास्त स्वरूपात परावर्तित करतात. ( Nickel-Iron) प्रामुख्याने जस्त व लोह असणार्‍या मोठ्या लघुग्रहांच्या टकरीमध्ये त्यांच्या तुकड्यांपासून अशा प्रकारचे लघुग्रह निर्माण होतात. त्यांना नैसर्गिक रंग असतो तर त्यांच्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त आढळून येते. लघुग्रहांच्या निर्मितीवर आतापर्यंत अनेक निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. काहींच्या मते सूर्यमालेच्या निर्मितीच्या वेळेस या लघुग्रहांची निर्मिती झाली असावी, कारण जरी सर्व लघुग्रहांना एकत्र केले तरी त्यांच्यापासून एखादा मध्यम आकाराचा ग्रह तयार होऊ शकत नाही. तर काहींच्या मते धूमकेतूने त्याच्या मार्गामध्ये सोडलेल्या बर्फ आणि धूळ यामुळे हे लघुग्रह निर्माण झाले असावेत. गुरू :- सूर्यमालेतील पाचवा ग्रह गुरू, गुरू म्हणजे एक श्रेष्ठ स्थान. नावाप्रमाणेच सर्व ग्रहांचा गुरू आहे. कारण त्याचा आकारच त्याचे मोठे वैशिष्ट्य आहे. हा सर्व ग्रहांमध्ये सर्वात मोठा आहे. त्याचा व्यास साधारणतः १, ४२, ९८५ कि. मी. आहे. दुसर्‍या शब्दांमध्ये सांगायचे तर आपल्या पृथ्वी सारख्या अकरा पृथ्वी या ग्रहाच्या व्यासावर ओळीने सहज बसू शकतील. त्याचे सूर्यापासूनचे अंतर ७७८, ४१२, ०१० कि. मी. ( 5.20336301 A.U.) आहे. बुध, शुक्र, पृथ्वी व मंगळ हे ग्रह घनरूप पदार्थांनी बनलेले आहेत. याउलट गुरुचा अंतर्भाग हा द्रवरूप लोखंडाचा आहे व या द्रवरूप चेंडूच्या बाहेरच्या भागात वायूचे दाट ढग आहेत. ह्या ढगांमुळेच गुरुवर आडवे पट्टे दिसतात. ह्या ग्रहाचा पृष्ठभाग वायुरुप असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वादळ होत असतात. ह्याच वादळांमुळे या ग्रहांवर एक मोठा भोवरा निर्माण झाला आहे. ज्याचा आकार पृथ्वीच्या तिप्पट आहे. ज्यास रक्तरंजित लाल ठिपका असे देखिल म्हणतात. प्रचंड आकारामुळे त्याचे गुरुत्वाकर्षण देखिल प्रचंड आहे. इतकेच नाही तर त्याचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग देखिल प्रचंड आहे. स्वतःभोवती फेरा मारण्यास त्यास ९ तास ५० मिनिटे लागतात. सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यास त्यास १२ वर्ष लागतात. याचाच अर्थ गुरू दरवर्षी एका राशीमध्ये वास्तव्य करतो. पृथ्वीप्रमाणेच गुरू देखिल एक मोठा चुंबक आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे १६ जुलै १९९४ रोजी शुमेकर लेव्ही-९ हा धूमकेतू या ग्रहावर आदळला. या टकरीत या धुमकेतूचे अनेक तुकडे होऊन ते दूरवर पसरले. ही प्रक्रिया २२ जुलै १९९४ पर्यंत चालू होती. तो धूमकेतू गुरू ऐवजी पृथ्वीवर आदळला असता तर काही क्षणातच पृथ्वीवरील सजीव सृष्टी नष्ट झाली असती. इतकी तीव्रता या धूमकेतूमध्ये होती. दुर्बिणीने पाहिल्यास त्याचे चार चंद्र फार सुंदर दिसतात. सर्व प्रथम गॅलिलिओने या चंद्रांना पाहिल्याने यास गॅलिलिओचे चंद्र देखिल म्हणतात. त्यांची नावे अशी आहेत - इयो, युरोपा, गॅनिमेड व कॅलिस्टो. यामधील गॅनिमेड हा तर बुध ग्रहापेक्षा देखिल मोठा आहे. आतापर्यंत गुरू ग्रहाचे ४० चंद्र शोधण्यात आले आहेत. तसेच शक्तिशाली दुर्बिणीने पाहिल्यास या ग्रहा भोवती कडा देखिल आढळून आली आहे. शनी :- सूर्यमालेतील सहावा ग्रह व गुरू नंतरचा सर्वात मोठा ग्रह म्हणजे शनी. ह्याचा आकार देखिल प्रचंड आहे. याचा व्यास साधारणतः १, २०, ५३७ कि. मी. इतका आहे. परंतु प्रचंड आकारमानापेक्षा तो जास्त प्रसिद्ध आहे त्याच्या भोवती असलेल्या कड्यामूळे. गुरू ग्रहाप्रमाणेच हा ग्रह देखिल वायूमय बनलेला आहे. स्वतःभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास या ग्रहास साधारणतः १० तास लागतात व सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास यास जवळपास २९ वर्ष लागतात. सूर्यापासून हा ग्रह जवळपास १, ४२६, ७२५, ४०० कि. मी. ( 9.53707031 A.U.) अंतरावर आहे. गुरू ग्रहांच्या चंद्राप्रमाणे शनी या ग्रहाच्या कड्यांचे देखिल सर्वप्रथम दर्शन गॅलिलिओने आपल्या दुर्बिणीतून घेतले. प्रचंड आकाराचा असून देखिल याची घनता पाण्याहून कमी आहे. समजा जर एका मोठ्या समुद्रामध्ये जर शनी ग्रह टाकला तर तो चक्क तरंगू लागेल. लहान मोठ्या असंख्य खडकांपासून शनी ग्रहाची कडी निर्माण झाली आहेत. कधी एके काळी शनीच्याच एखाद्या चंद्राचा स्फोट होऊन त्यापासून ही कडी निर्माण झाली असावीत. वस्तुतः या कड्यांची संख्या असंख्य असली तरी प्रामुख्याने या कड्यांची सात निरनिराळ्या कड्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. अतिशय कमी तापमानामुळे या कड्यांतील सर्व तुकडे बर्फाच्छादित आहेत. या कड्यांची जाडी जवळपास १० ते १५ कि. मी. आहे. शनी ग्रह त्याच्या अक्षाशी साधारण २८ अंशांनी कललेला असल्यामुळेच पृथ्वीवरून आपणास त्याची कडी व्यवस्थित दिसतात. अन्यवेळी पृथ्वी शनीच्या विषुववृत्त पातळीत येते, तेव्हा त्याची कडा जवळजवळ अदृश्य होते व त्याजागी शनीला छेदणारी एक बरीक रेषा आपणास दिसते. शनीला एकूण ३० उपग्रह आहेत. त्यामधील टायटन आकाराने बुध ग्रहा एवढा आहे. शनी हा देखिल एक मोठा चुंबक असल्याचे आढळून आले आहे. परंतु ते गुरू एवढे शक्तिशाली आहे. युरेनस :- सूर्यमालेतील सातवा ग्रह म्हणजे युरेनस. बुध पासून शनी पर्यंत सर्व ग्रह नुसत्या डोळ्यांनी दिसत असले तरी शनी नंतरचे इतर ग्रह पाहण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता भासते. या ग्रहाचा शोध १३ मार्च १७८१ रोजी विल्यम हर्षल याने लावला. वास्तविक शंभर वर्ष त्याआधी हा ग्रह काही शास्त्रज्ञांनी पाहिला होता. परंतु त्याची नोंद एक तारा अशी केली गेली होती. या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर साधारणतः २, ८७०, ९७२, २०० कि. मी. ( 19.19126393 A.U.) आहे. स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास या ग्रहास १६ तास लागतात. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास यास ८४ वर्षे लागतात. युरेनसची सूर्यप्रदक्षिणा पश्चिमेकडून पूर्वेकडे असली तरी त्याचे स्वतःभोवती फिरणे मात्र पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. याचा व्यास साधारणतः ५१, ११९ कि. मी. आहे. युरेनसचा आस ९८ अंशांनी कललेला असल्यामुळे तो घरंगळत चालल्या सारखा दिसतो. त्यामुळे कधी त्याच्या धृव भागाचे तर कधी विषुववृत्तीय भागांचे दर्शन घडते. अंतराळयानांनी पाठविलेल्या माहितीनुसार या ग्रहाभोवती देखिल शनी ग्रहाप्रमाणे कडे आढळून आले आहे. ही कडा युरेनसच्या केंद्रभागापासून ५०, ००० कि. मी. अंतरावर आहे. पण ही कडा दुर्बिणीतून दिसत नाही. या ग्रहास एकूण १५ चंद्र आहेत. ज्यामध्ये पाच मोठे चंद्र आहेत आणि दहा लहान चंद्र आहेत ज्यांचा शोध अलीकडेच पाठविलेल्या व्हॉएजर या यानामुळे लागला. युरेनस आपल्या कक्षेवरून एका सेकंदाला एक मैल सरकतो. युरेनस भोवती देखिल चुंबकीय क्षेत्र असल्याचे आढळून आले आहे. नेप्च्यून :- सूर्यमालेतील नेप्च्यून हा आठवा ग्रह. या ग्रहाचा शोध ४ ऑगस्ट १९६४ रोजी लागला. हा ग्रह देखिल दुर्बिणीनेच पाहता येतो. नेप्च्यून हा ग्रह युरेनसच्या ही पुढे एक अब्ज मैल अंतरावर आहे. या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर साधारणतः ४, ४९८, २५२, ९०० कि. मी. ( 30.06896348 A.U.) आहे. स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास यास साधारणतः १९ दिवस लागतात. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास यास जवळपास १६५ वर्षे लागतात. याचा व्यास साधारणतः ४९, ५२८ कि. मी. आहे. अंतराळयानांनी पाठविलेल्या माहितीनुसार या ग्रहाभोवती देखिल कडे आढळून आले आहे. परंतु इतर ग्रहांच्या कड्याप्रमाणे ते गोलाकृती नसून त्याच्या एका ठिकाणी रिकामी जागा आहे. ज्यामुळे ते घोड्याच्या नालेसारखे वाटते. ही कडा दुर्बिणीतून दिसत नाही. नेप्च्यूनचे आकारमान सुमारे युरेनसच्या आकारमानाइतकेच आहे. सूर्यापासून अतिशय दूर अंतरावर असल्याने तेथे कमालीची थंडी आहे. तेथील वातावरण मिथेन या विषारी वायूचे बनलेले आहे. नेप्च्यून ग्रहास एकूण ११ चंद्र आहेत. तसेच या ग्रहास देखिल चुंबकीय क्षेत्र आहे. प्लुटो :- सूर्यमालेतील नववा आणि शेवटचा ग्रह. युरेनस आणि नेप्च्यूनचा शोध लागल्यानंतर त्यांची भ्रमण कक्षा ठरविण्यात आली. गणित शास्त्राप्रमाणे हे दोन्ही ग्रह आपापल्या मार्गावरून जाणे आवश्यक होते. परंतु ते कक्षेच्या थोडे अलीकडे पलीकडे दिसू लागले. तेव्हा या ग्रहांना आकर्षित करणारा एखादा ग्रह कुठेतरी असावा असे शास्त्रज्ञाना वाटले. त्या दिशेने त्यांचे प्रयत्न सुरू झाले आणि प्रयत्नांना गणिताची जोड मिळाल्याने अखेर १८ फेब्रुवारी १९३० साली लुटो या ग्रहाचा शोध लागला. दुर्बिणीनेच हा ग्रह पाहता येतो. या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर साधारणतः ५, ९०६, ३७६, २०० कि. मी. ( 39.48168677 A.U.) आहे. स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास यास साधारणतः ६. ५ दिवस लागतात. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास यास जवळपास २४८ वर्षे लागतात. शास्त्रज्ञानी केलेल्या आकारमानापेक्षा हा फारच लहान निघाला. प्लुटोचे आकारमान पृथ्वीच्या आकारमानापेक्षा कमी आहे. याचा व्यास साधारणतः २, ३६० कि. मी. आहे. धन्यवाद........!

Thursday 17 March 2016

शिक्षण हक्क कलमे

शिक्षण हक्क कलमे
           ✏RTE- 2009 चे कलमे-
सदर अधिनियमात एकूण ३८ कलम आहेत. त्या कलमांचे शीर्षक, कलम क्रमांकानुसार खालीलप्रमाणे.
कलम क्रमांक १ = संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ.
कलम क्रमांक २ = व्याख्या.
कलम क्रमांक ३ = मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार.
कलम क्रमांक ४ = वयानुरूप प्रवेश (थेट).
कलम क्रमांक ५ = दाखला हस्तांतरण.
कलम क्रमांक ६ = शाळा स्थापन.
कलम क्रमांक ७ = आर्थीक व इतर जबाबदाऱ्या.
कलम क्रमांक ८ = शासनाची कर्तव्ये.
कलम क्रमांक ९ = स्थानिकप्राधिकरण कर्तव्ये.
कलम क्रमांक १० = माता पिता व पालक कर्तव्ये.
कलम क्रमांक ११ = शालापूर्व शिक्षण तरतूद.
कलम क्रमांक १२ = शाळांची जबाबदारी.
कलम क्रमांक १३ = प्रवेश फी व चाचणी पध्दत.
कलम क्रमांक १४ = प्रवेशासाठी वयाचा पुरावा.
कलम क्रमांक १५ = प्रवेशास नकार.
कलम क्रमांक १६ = मागे ठेवण्यास व निष्कासनास प्रतिबंध .
कलम क्रमांक १७ = शारिरीक शिक्षा व मानसीक त्रास प्रतिबंध.
कलम क्रमांक १८ = शाळा स्थापनेस मान्यता .
कलम क्रमांक १९ = शाळेसाठी मानके व निकष .
कलम क्रमांक २० = अनुसूचीमध्ये सुधारणा अधिकार .
कलम क्रमांक २१ = शाळा व्यव.स्थापन समिती .
कलम क्रमांक २२ = शालेय विकास योजना .
कलम क्रमांक २३ = शिक्षक नेमणूक,अहर्ता व अटी शर्ती.
कलम क्रमांक २४ = शिक्षकांची कर्तव्ये.
कलम क्रमांक २५ = विद्यार्थी शिक्षक प्रमाण.
कलम क्रमांक २६ = शिक्षकाची रिक्त पदे भरणे.
कलम क्रमांक २७ = शिक्षणेतर प्रयोजनास प्रतिबंध.
कलम क्रमांक २८ = खाजगी शिकवणी प्रतिबंध.
कलम क्रमांक २९ = अभ्यासक्रम व मुल्यमापन.
कलम क्रमांक ३० = परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र.
कलम क्रमांक ३१ = बालकाच्या हक्काचे सरंक्षण.
कलम क्रमांक ३२ = गाऱ्हाणी दूर करणे.
कलम क्रमांक ३३ = राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना.
कलम क्रमांक ३४ = राज्य सल्लागार परिषदेची स्थापना.
कलम क्रमांक ३५ = निदेश देण्याचा अधिकार.
कलम क्रमांक ३६ = खटला चालविण्यास पूर्वमंजुरी.
कलम क्रमांक३७ = सदभावनापुर्वक कारवाईस संरक्षण.
कलम क्रमांक ३८ = समुचित शासनास नियम करण्याचा अधिकार.

                           संकलन
                     सतिश मुणगेकर

Friday 11 March 2016

Wednesday 9 March 2016

संत माहिती

श्री बसवेश्वर बसवेश्वर (अन्य नावे: बसवा, बसवण्णा, कन्नड: ಬಸವೇಶ್ವರ) (जन्म : ३० मार्च, इ.स. ११३४ - मृत्यू : इ.स. ११६७) हे कर्नाटकातील संत व समाजसुधारक होते. त्यांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध व अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी निर्गुण, निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला. बसवेश्वरांनी घालून दिलेल्या मार्गाला लिंगायत पंथ या नावाने ओळखले जाते. इसवी सनाच्या बाराव्या शतकात अहिंसा, सत्य, भूतदया आणि सर्वधर्मसमानता, यासारखे क्रांतिकारक विचार मांडले. हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य पद्धतीला आणि त्यातून जन्मलेल्या जाती पद्धतीला त्यांनी कायम विरोध केला. "कायकवे कैलास" म्हणजे कर्म करण्यातच स्वर्ग आहे हा विचार त्यांनी मांडला. कोणतेही काम कमी प्रतीचे किंवा उच्च प्रतीचे नसते, सर्व मानव समान आहेत. कोणतीही जात श्रेष्ठ किँवा कनिष्ठ नाही असे तत्वज्ञान त्यांनी मांडले. आपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यानी लिँगायत धर्माची स्थापना केली. विश्वगुरू महामानव महात्मा बसवेश्वर :- समाजसुधारक.बसवण्णा यांचा जन्म म्हैसूर (आजचा कर्नाटक) राज्यातील विजापूर जिल्ह्यातल्या बागेवाडी या तालुक्यात कम्मेकुळ या गावात, वैशाख शुद्ध तृतीया इ.स. ११३४ रोजी झाला. त्यांचे वडील मादीराज आणि माता मादलांबिका. बसवण्णांनी कुडलसंगम येथे वास्तव्य केले. कुडलसंगम हे मलप्रभा व कृष्णा नदीच्या संगमावर बसलेले विजापुर जिल्ह्यातील छोटेसे गाव आहे. बसवण्णांनी समाजातील वाईट चालीरीतींना शह देण्याचा सम्यक विचार केला आणि येथूनच त्यांच्या सामाजिक आंदोलनास सुरुवात झाली. पुढे कामाच्या शोधार्थ बसवण्णा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे आले. मंगळवेढा येथे बसवण्णांनी सामाजिक चळवळ आरंभ केली. ही चळवळ धार्मिक कर्म कांडाविरुद्ध आणि वर्णव्यवस्थेविरुद्ध होती. त्यांच्या परिवर्तनवादी विचारसरणीने बसवण्णा समाजात लोकप्रिय झाले. वैदिक धर्म नाकारून बसवण्णांनी लिंगायत पंथ स्थापन केला. जगातील पहिल्या लोकशाही संसदेची स्थापना :- बसवण्णांनी मंगळवेढा येथे "जगातील पहिली लोकशाही संसद म्हणजेच 'अनुभव मंटपाची' स्थापना केली. या अनुभव मंटपात सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन सामाजिक अडचणींवर कशी मात करावी यावर चर्चा करण्याचे कार्य चालत असे. बसवण्णांनी समाजातील रूढीपरंपरा, वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजाच्या हितकारक गोष्टींची अंमलबजावणी करणारी नवीन यंत्रणा तयार केली. अनुभव मंटप म्हणजे जगातील पहिली संसद. अनुक्रमणिका लिंगायत धर्म संस्थापक युगप्रवर्तक महात्मा बसवेश्वर चातुर्वर्ण्य बसवेश्वरांवरील पुस्तके बाह्य दुवे लिंगायत धर्म संस्थापक युगप्रवर्तक महात्मा बसवेश्वर वेदशास्त्र, होम-हवन, मूर्तिपूजा नाकारून बसवण्णांनी 'लिंगायत धर्म' स्थापन केला. आपण सर्व एकच आहोत हे सांगताना बसवण्णा आपल्या वचनात म्हणतात (वचन कन्नड भाषेत) : - "इवनारव, इवनारव, इवनारवनेंदनिसदिरयया इस नम्मव, इव नम्मव, नम्मवनेंदनिसयया, कुडलसंगमदेवा, निम्म मनेय मगनैदानिय्या." वरील वचन मराठीत :- हा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा ऐसे नच म्हणवावे; हा आमुचा, हा आमुचा, हा आमुचा ऐसेचि वदवावे. कुडलसंगमदेवा, तुमचा घरचा पुत्र म्हणवावे. 'वेद शास्त्र धर्म जे काही सांगतील मी त्यांना मानणार नाही.' आपल्या वचनात बसवण्णा म्हणतात, "वेदक्के ओरेय कट्टवे,शास्त्रक्के निगळवनिक्कु वे, तर्कद बेन्न बारनेत्तुव, आगमद मूग कोयिवे, नोडखा, महादानी कुडलसंगमदेवा, मादार चेन्नय्यन, मनेय मग नामय्या." वचन मराठीत :- वेदावर खडग प्रहार करेन शास्त्राला बेड्या लावीन तर्कशास्त्राच्या पाठीवर आसूड ओढेन आगमशास्त्राचे नाक कापेन मातंग चेन्नयाचा प्रिय आहे मी, कुडलसंगमदेवा. मंदिर म्हणजे बहुजनाचे अंधश्रद्धा व भोळी मनोवृत्तीचे केंद्र आहे. म्हणून बसवण्णांनी आपल्या अनुयायांना मंदिर न बांधण्याचा आदेश दिला आहे. आपल्या देहालाच देवालय माना. देवालयापेक्षा देहालय श्रेष्ठ आहे.अशी शुद्ध विचारसरणी बसवण्णांची होती. चातुर्वर्ण्य वर्ण धर्माला वेडाचार ठरवतांना बसवण्णा म्हणतात, चांभार उत्तम तो दुर्वास कश्यप लोहार, कौंडिण्य तो न्हावी तिन्ही लोकी बरवी प्रसिद्धी ती जातीचे श्रेष्ठत्व हाची वेडाचार. भस्म, गंध टिळा लावून काय उपयोग आहे, मणी गळ्यात बांधून काय उपयोग आहे जर तुमच्यात शुद्ध अंतरंग नसेल, मनाची शुद्धता नसेल हे सर्व देखावा आहे. लोक, ज्या गोष्टी आपल्या आचरणात येणे कठीण आहे त्याच गोष्टीच्या बाह्य अवडंबराने स्वतः शुद्ध मनाचे आहोत असा खोटा आव आणतात. जे देवाला दूध, लोणी, तूप अर्पण करतात ते अंधभक्त होत. त्या संदर्भात बसवण्णा म्हणतात, दुग्ध ते उच्छिट तथा वासराचे। पाणी ते मत्स्याचे उच्छिष्टची। पुष्प ते उच्छिट तथा भ्रमराचे। साधन पूजेचे काय सांगा ? दूध हे वासराचे उष्ट असते, पाणी माशांचे उष्ट असते, पुष्प भ्रमराचे उष्ट असते असे वापरलेले अस्वच्छ उष्ट साधने देवाच्या पूजेचे साधन होऊ शकते का ? अशाप्रकारे बसवण्णांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीयता, बळी प्रथा, व्रतवैकल्य, उपास-तापास इत्यादींवर प्रखर हल्ला केला आहे. वीरशैव विचारधारा ही लिंगायतांना धार्मिक, मानसिक आणि सांस्कृतिक गुलाम करण्याचे षड्यंत्र आहे. आज लिंगायत विरुद्ध वीरशैव असा भेद निर्माण झाला आहे. वीरशैव हे सनातन धर्माचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. वर्णधर्म त्यांना मान्य आहे, ब्राह्मण व्रतवैकल्ये मान्य आहेत. वीरशैव विचारधारेचा प्रमुख ग्रंथ सिंद्धान्त ’शिखामणी’ हा वर्णाश्रम धर्मावर आधारित असल्याचे कारण हा ग्रंथ आगम, निगम, शैवपुराण, वेद शास्त्र इत्यादींच्या मूळ स्रोतांशी बांधलेला आहे. बसवण्णा एका वचनात म्हणतात : - दगडाचा देव देव नव्हे। मातीचा देव देव नव्हे।। वृक्षदेव देव नव्हे। सेतु बंध रामेश्वर।। अन् इतर क्षेत्राचा। देव देव नव्हे।। देव तुमच्या अंतर्यामी। हे कुडलसंगमदेवा।। आज परिस्थिति अशी आहे की लिंगायत धर्माचा मूळ उद्देश आणि बसवण्णांची शिकवण काय आहे हे लोकांना माहीत नाही. लिंगातत हे पूर्णपणे ब्राह्मणी वर्चस्वाखाली आहेत. लिंगायत राशीभविष्य पाहतात तेही ब्राह्मणाकडून; लग्नाचे मुहूर्त ब्राह्मणाकडून काढून घेतात; त्यांचे लग्न व अन्य धार्मिक संस्कार ब्राह्मणच करतात. लिंगायत हे बसवण्णांच्या मूळ विचारधारणेपासून दुरावला गेला आहे.. त्यांचे ब्राह्मणीकरण केले गेले. लिंगायत हे कर्मकांड, देव, व्रतवैकल्य, भविष्यवाणी, यज्ञ, अंधश्रद्धा, आत्मा अशा चाकोरीत गुंतलेले आहेत. त्यामुळे लोकांना वाटते की ते ब्राह्मण आहेत. असाच प्रचार व प्रसार करून ब्राह्मणवादी लोक यशस्वी झाले आणि लिंगायतांना ब्राह्मणी धर्माच्या अधीन बनवले. संत बसवण्णांनी आयुष्यभर भटशाहीतून मुक्त करण्यासाठी अनुभव मंटपाची स्थापना केली. त्यातून साहित्य निर्माण केले. वेद, पुराण, स्वर्ग, देव देवता, आत्मा, पुनर्जन्म, यज्ञ, वैकल्य ही थोतांडे नाकारली आणि ७७० परगड जातीतील लोकांना सोबत घेऊन लिंगायत धर्माची स्थापना केली. बसवण्णा हे नाग लोकांचे दैवत आहे हे पटवून सांगताना अक्कामहादेवी आपल्या वचनात म्हणतात:- देव लोकांचा देव बसवण्णा मत्स लोकांचा देव बसवण्णा, नाग लोकांचा देव बसवण्णा। मेदुगिरि मंदागिरीचा देव बसवण्णा। चेन्नमल्लिकार्जुना माझा तुमचा। तव शरणांचा देव बसवण्णा। बसवेश्वर समाधी - कुडलसंगम जिल्हा बागलकोट, कर्नाटक बसवेश्वरांवरील पुस्तके महात्मा बसवेश्वर - कार्य आणि कर्तृत्व (मराठी, लेखक - सुभाष देशपांडे) बसवेश्वर - काव्यशक्ति और सामाजिक शक्ति (हिंदी, लेखक - काशीनाथ अंबलगे) बसवेश्वर (इंग्रजी, लेखक - अनंत पै)

Sunday 6 March 2016